श्री अरविंदांची जीवनकथा पुनरावलोकन

१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी स्वतंत्र भारताचा जन्म झाला.
१५ ऑगस्ट, १९७२ हा श्री अरविंदांचा जन्मदिवस आणि स्वतंत्र भारताचा वर्धापन दिन आणि त्याच दिवशी भारतीय पांचांगाप्रमाने गोकुळ अष्टमी,श्री कृष्ण जन्मदिन होते.
हे सर्व पाहता हा सर्व योगायोग असेल का ? की याचा काही अर्थ आहे. असा प्रश्न पडतो.
चला तर मग जाणून घेऊया श्री अरविंद कोण होते.पुस्तकातून समजलेले त्यांचे जीवन....
श्री अरविंद यांचे संपूर्ण नाव अरविंद कृष्णधन घोष असे आहे. डॉ कृष्णाधन घोष हे एक अत्यंत हुशार डॉक्टर. कोलकात्याच्या मेडिकल कॉलेज मधून पदवी घेऊन उच्च पदवीसाठी ते इंग्लंड ला गेले.त्या काळी भारत देश सोडून परदेशी जाणाऱ्याला वाळीत टाकले जाई, महापाप समजले जाई परंतु हे साहस त्यांनी त्या काळी केले व ते भारतात २ वर्षांनी परत आले रंगरूप बदलून पूर्णतः इंग्लिश बनून. पोशाख,राहणीमान अगदी इंग्लिश, इंग्लंड ची एम डी पदवी घेऊन.त्यांना भारताचे काहीच आवडत न्हवते, त्यांचे लग्न १९ व्या वर्षी स्वर्णलतेशी जाहले व त्यांना पाच मुले झाली त्यापैकी एक हे अरविंद. तीन भाऊ , एक बहिण, विजयभूषण, मनमोहन,बरिन आणि सरोजिनी.
श्री अरविंद यांचे टोपण नाव ऑरो. लहानपणापासूनच कृष्नधन घोष यांनी आपल्या मुलांना भारतीय जीवनाचा,संस्कृतीचा,शिक्षणाचा वाराही लागू दिला नाही.त्यांनी तीनही मुलांना दार्जिलिंगला शिक्षणासाठी इंग्रजी मुलांच्या शाळेत घातले. ऑरो चे शिक्षण सुरू झाले.ऑरो हे लहानपणापासुनच हुशार,शांत होते.त्यांनी भराभर सर्व शिक्षण घेण्यास सुरुवात केली . त्यांनी इंग्लिश, लॅटिन अश्या अनेक भाषा शिकून घेतल्या. त्यांना वाचनाची खुप खुप आवड होती.
त्यांनी ग्रंथ,कादंबऱ्या,काव्य सर्व प्रकारचे साहित्यांचे वाचन केले. 
चौदा वर्षे त्यांनी इंग्लंडला घालविली हे चौदा वर्ष म्हणजे त्यांच्यासाठी वनवासच होते जणू कारण...
 त्यांना त्यांचे वडील खर्चासाठी तिघात ३६० पाउंड पाठवत असत पण नंतर नंतर तेही येणे बंद झाले कारण त्यांचे वडील खूप दयाळू ,त्यांना गरिबांचे हाल बघवत नसत ते सर्व पैसे समाजसेवेत लावत.मुलांना पाठवायला काहीच उरत नसे.
शीक्षण करत त्यांना व त्यांच्या भावांना काम करावे लागत.
श्री अरविंद हे एक महाकवी सुद्धा होते.त्यांनी अनेक लेख, कविता,काव्य लिहिली, " सावित्री " हा त्यापैकी एक महान काव्य त्यांनी लिहिले .अनेक नाटके त्यांनी लिहिली.
ते परदेशात राहूनही त्यांचे भारतावर प्रेम कसे जडले,त्यांनी राष्ट्रीय चळवळीत उडी घेतली, त्यांना अटक का झाली,त्यांच्या विरुद्ध रचलेले अनेक कट कारस्थाने हे सर्व वाचताना त्यांनी जे काही सहन केले याचा अंदाज आपण लावू शकत नाही...
हे सर्व करताना त्यांनी योग अभ्यासही सुरू केला . असे कोणते कार्य नाही जे त्यांनी केले नाही. त्यांची देवावरील व देशावरील श्रद्धा,विश्वास,भक्ती हे त्यांच्या कडून करून घेत होते...
मातृभूमीबद्दल ते म्हणतात:- आपली मातृभूमी म्हणजे तरी काय ? तो म्हणजे जमिनीचा एक तुकडा न्हवे, ...ती एक महान शक्ती आहे ... अध्यात्मिक शक्ती हाच अन्य साऱ्या शक्तींचा स्रोत आहे ... ज्याला आपण भारत म्हणतो.
५ डिसेंबर १९५० रोजी त्यांनी महासमाधी घेतली....त्यांची आत्मा ही परमात्म्यास जाऊन मिळाली....

       पुस्तक वाचल्यानंतर मला सुचलेल्या काही ओळी.....

अनुभवातूनी त्यांच्या जणू ते 
नाही मी जगले
आजूबाजूच्या सानिध्यात मजही जणू
नारायण दिसले
प्रत्येकाच्या जगण्यामध्ये काहीतरी 
अर्थ दडले 
पुस्तकांच्या पनांमधून श्री कृष्णांचे हे
शब्द उमलले 
अनुभवातूनी त्यांच्या जणु ते 
नाही मी जगले.

                                     ✿ ✿⁠ ✿⁠ 

Comments

Popular posts from this blog

अग्निपंख पुनरावलोकन