अग्निपंख पुनरावलोकन
तामिळाडूमधील एका छोट्या गावात रामेश्वरम् या गावात एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १५ ऑक्टोबर १९३१ मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे आजचे आपले आदर्श डॉ ए पी जे अब्दुल कलाम सर.....
गरीब,सामान्य कुटुंबात वाढलेले कलाम सर, लहानपणासूनच शिकण्याची आवड व जिद्द असणारे ,पुस्तके गोळा करून त्यांची ज्ञान ग्रहण करण्याची भूक भागवणारे ते देशाच्या तंत्रज्ञानविषयक लढायीसाठी पृथ्वी,अग्नी, त्रिशूल,नाग,यांसारख्या क्षेपणास्त्रे बनवण्यापर्यंत त्यांची जडणघडण त्यांची मेहनत, शिस्त, कामावरची श्रद्धा,कामावरील प्रेम,एकजुटीने काम करण्यावर जोर, पावलोपावली दुःख असतानाही कणखरपणे उभे राहणे,आपल्या कुटुंबियांनपासून दूर राहून देशाच्या उत्तम भविष्यासाठी काम करणे हे सर्व अनुभव आज हे अदभुत पुस्तक वाचताना अनुभवले हे पुस्तक वाचताना वाचतच रहावेसे वाटते.
खरेतर असे समजले जाते की वैज्ञानिकाचे दृष्टिकोन हे सरळ आणि पुराव्यानुसार विश्वास ठेवणारे असते जे काही घडले ते सर्व विज्ञानामुळेच असे समजले जाते.पण अब्दुल कलाम यांच्या देवावरचा विश्वास पाहून मनाला विश्वास बसतो की दैवी शक्ती ही खरे खूर खूप महान कार्य करते आणि आपल्याला सतत पावलोपावली दिशा दाखवत असते.त्यांचा प्रत्येक प्रसंगांमध्ये देवाचा खुप मोठा हात असतो हा त्यांचा विश्वास पूर्ण पुस्तक वाच्णाऱ्याला समजून येते.
अब्दुल कलाम यांचे पुस्तक अग्निपंख वाचून नुसतच मन भारावून जात गेलं. प्रत्येक गोष्टीतून अनुभव घेत त्या गोष्टीत कुशल कसे व्हायचे हे कळते.
आवडीच्या क्षेत्रात जागा मिळाली नाही तरी आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही असे त्यांच्या चरित्रातून कळते.
नियतीने आपल्यासाठी नेहमीच जास्त चांगले अनपेक्षित लिहून ठेवलेले असते हे कलाम सर यांच्या अदभुत journey वरून कळते.....
अग्निपंख या आत्मचरित्रातील काही आत्माबल देणारे अब्दुल कलाम यांनी केलेले कथन आणि त्यांचे विचार....
◍ त्यांच्या गुरुजींचे कथन - आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात.पहिली म्हणजे माणसाला इच्छा हवी, महत्त्वाकांक्षा हवी; दुसरी ,तिचा ध्यास घ्यायला हवा , आणि तीसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा दृढविश्र्वास हवा.
◍ कलाम यांचे कथन - तुम्ही जर लेखक आहात आणि मनापासून, हृदयाच्या तळापासून तुम्हाला वकील वा डॉक्टर बनायचे आहे;तर तुम्ही लिहिलेल्या शब्दांनी वाचकांची खरीखुरी भूक भागू शकणार नाही. तुम्हाला मनापासून व्यावसायिक बनायचे आहे,पण तुम्हाला शिक्षिकी पेशा करावा लागला; तर तुम्ही विद्यार्थ्याची ज्ञानाची भूक पूर्ण भागवू शकणार नाही.विज्ञानाची नावड असणारा कधी संशोधक होऊ शकणार नाही.
◍ एखाद्या छोट्या गोष्टीसाठी महत्त्वाची कामे अडून राहतात,असा नेहमी अनुभव येतो; म्हणून प्रत्येकाने लहानसहान बाबिदेखील दुर्लक्षू नयेत.
◍ स्वतःच्या चुकांपासून, अपयशांपासून शिकणे माणसाला उत्तम प्रशिक्षण देऊ शकते.
Comments
Post a Comment